विनायक दामोदर सावरकर | |
---|---|
जन्म: | मे २८, इ.स. १८८३ भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | फेब्रुवारी २६, इ.स. १९६६ दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | अभिनव भारत अखिल भारतीय हिंदू महासभा |
धर्म: | हिंदू |
वडील: | दामोदर सावरकर |
आई: | राधा सावरकर |
पत्नी नाव: | यमुनाबाई विनायक सावरकर |
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.सावरकरांनी 1857 चा स्वातंञ्यसमर हा लेख लिहला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा