बाळ गंगाधर टिळक | |
---|---|
इ.स. १९१० च्या सुमारास घेतलेले टिळकांचे प्रकाशचित्र | |
टोपणनाव: | लोकमान्य टिळक |
जन्म: | जुलै २३,इ.स. १८५६ रत्नागिरी(टिळक आळी), रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | ऑगस्ट १, इ.स. १९२० पुणे, महाराष्ट्र, भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | अखिल भारतीय काँग्रेस |
पत्रकारिता/ लेखन: | केसरी मराठा |
पुरस्कार: | लोकमान्य |
धर्म: | हिंदू |
वडील: | गंगाधर रामचंद्र टिळक |
आई: | पार्वतीबाई टिळक |
पत्नी नाव: | तापीबाई |
अपत्ये: | श्रीधर बळवंत टिळक[१] |
तळटिपा: | "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच " |
बालपण
टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते[२]. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.[३]
त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.[४] पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.[५]
(छायाचित्र : टिळक कुटुंबीय- लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर. छायाचित्रण वर्ष अज्ञात)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा